https://ift.tt/34pzxqr
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f9FBpo
मुंबई : करोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध जाहीर करत असताना मॉल, हॉटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे आदी सर्व ठिकाणे ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र शाळा सरसरकट १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली, तरी योग्य ती काळजी घेऊन ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे अशा विविध भागांमध्ये तरी प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवल्या जाऊ शकतात. सरकारने पुन्हा एकदा प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. 'राज्यातील सर्व शाळा सरसकट बंद करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. शाळांबाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन व स्थानिक प्रशासनाला अधिकार देऊन निर्णय घ्यायला हवेत,' असे मत राज्य मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते महेंद्र गुणपुले यांनी व्यक्त केले. 'अमेरिकेत रोजच्या चाचण्यांत सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त व्यक्ती करोना पॉझिटिव्ह येतात. परंतु सर्व शाळा पूर्ण क्षमतेने नियमितपणे सुरू आहेत,' अशी माहिती राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांनी दिली. तेथे सध्या नाताळची सुट्टी आहे. दहा जानेवारीला पुन्हा शाळा उघडतील. सर्व विद्यार्थ्यांना स्वयंचाचणीसाठी प्रत्येकी दोन किट दिले आहेत. शाळेत येण्यापूर्वी त्यांनी घरीच सात आणि नऊ जानेवारी रोजी चाचण्या कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. काळपांडे यांनी दिली. असे विविध पर्याय शोधून प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवण्याबाबत सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f9FBpo
Post a Comment