https://ift.tt/3qnIGIy
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33pUDEJ
चालू वित्त वर्षात तीन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी १.३४ लाखांहून अधिक भरती केली आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या भरतीच्या तुलनेत ही आकडेवारी तब्बल चार पट अधिक आहे. डिसेंबरच्या तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेने ३४ हजार लोकांना नोकरीची संधी दिली. यापूर्वीही एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत कंपनीने ४३ हजार भरती केली होती. आता जानेवारी ते मार्च या तिमाहीतदेखील कंपनी नव्या लोकांची भरती करणार आहे. जी कथा टीसीएसची तीच व्यथा विप्रो आणि इन्फोसिसची देखील आहे. भारतीय आयटी सेक्टर (IT Sector) या नव्या समस्येने (The Great Resignation) ग्रासले आहे. , आणि यासारख्या टॉप आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना कंपनीत टिकवून ठेवण्यात अयशस्वी होत आहेत. या कंपन्यांचा Attrition Rate म्हणजेच नोकरी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची भरपाई म्हणून कंपन्या मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची भरती (Freshers Hiring) करत आहेत. TCS सारख्या कंपनीतही टिकत नाहीत कर्मचारी टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या तिन्ही कंपन्यांनी आपला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा अहवाल बुधवारी जारी केला. यात या कंपन्यांनी अट्रीशन रेट बाबत माहिती दिली. भारतातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएसमध्ये डिसेंबरच्या तिमाहीत नोकरी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढून १५.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. यापूर्वीच्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर २०२१ मध्ये हे प्रमाण ११.९ टक्के होते. टीसीएसनुसार हे प्रमाण आयटी क्षेत्रात सर्वात कमी आहे, पण तरीही ही स्थिती चांगली नाही. इन्फोसिसची नोकरी सोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक आहेत IT Professional भारतीय आयटी कंपनी इन्फोसिस मधील आकडेवारी पाहिली तर ही समस्या अधिक गंभीर असल्याचे जाणवेल. इन्फोसिसमध्ये डिसेंबरच्या तिमाहीत नोकरी सोडण्याचा दर २५.५ टक्के पर्यंत वाढला आहे. हाच दर सप्टेंबरच्या तिमाहीत २०.१ टक्के होता. एका वर्षात हे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले आहे. परिणाम स्वरुप कंपनी ५५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. Wipro तही हीच समस्या विप्रो कंपनीतही सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत नोकरी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण २०.५ होते, जे डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत २२.७ टक्क्यांवर पोहोचले. विप्रोने हा तोटा भरून काढण्यासाठी ३० हजार नव्या लोकांची भरती करण्याची योजना आखली आहे. किती भरती झाली होती? एका रिपोर्टनुसार, चालू वित्त वर्षात तिन्ही टॉप आयटी कंपन्यांनी १.३४ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ४ पट अधिक आहे. डिसेंबरच्या तिमाहीत टीसीएसने ३४ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. यापूर्वीच्या सहामाहीत कंपनीने ४३ हजार जणांना नोकरी दिली. कंपनी येत्या तिमाहीत जानेवारी-मार्च मध्ये आणखी नवी भरती करणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, विप्रोच्या कर्मचाऱ्यांची संख्या १० हजार आणि इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची संख्या १५ हजारांनी वाढली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33pUDEJ
Post a Comment