https://ift.tt/lj2WE0M
from मनोरंजन https://ift.tt/mbt2IM5

नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे. वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात. येथील मासे कोणीही कधीही मारत नाही.

महाड़ पासून सुमारे 20 कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात. येथे थेट वाहन जाते. चालण्याची अजिबात गरज नाही.
येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड, शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते. ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.
from मनोरंजन https://ift.tt/mbt2IM5
Post a Comment