https://ift.tt/3FXlQNB
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zvHIx8
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोना रुग्ण संख्या वाढ लक्षात घेत शहरातील () पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ६ जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ३१ जानेवारीपर्यंत या शाळा बंद राहतील. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा नियमित सुरू राहणार आहेत. राज्यासह देशभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या एका दिवसात तीन पटीने वाढली. राज्यात मुंबई पुणे शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद राहतील. शहरात पहिली ते सातवीपर्यंत शाळा २० डिसेंबरला सुरू करण्यात आल्या होत्या. पंधरा दिवसात करोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत या वर्गाच्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शहरातील सर्व माध्यमांच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा गुरुवार ६ जानेवारीपासून बंद राहतील असे स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात ३१ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहतील. त्यावेळी असलेली परिस्थिती लक्षात घेत शाळा सुरू करायच्या की बंद ठेवायचा याबाबत निर्णय घेतला जाईल. इयत्ता नववी ते इयत्ता बारावीचे वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. पहिली ते आठवी च्या बालकांसाठी ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहील, असे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी महाराष्ट्र टाइम्स शी बोलताना सांगितले. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zvHIx8
Post a Comment