https://ift.tt/SPoQsMl
from मनोरंजन https://ift.tt/D527stY

90च्या दशकात प्रेमात पडलेल्या एका अल्लड मुलीच विश्व तिच्या प्रियकराभोवती कस फिरत असत आणि प्रेमात पडल्यावर त्याव्यक्ती मध्ये गुंतन काय असत याच चित्रण या गाण्यात केले आहे. कोकणच्या रम्य निसर्गाच्या सानिध्यात या गाण्याचे चित्रीकरण झाले असून या गाण्याच्या निमित्ताने कोकण ही अनुभवायला मिळत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याच्या टिझरला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून या गाण्याचे दिग्दर्शन सागर गावकर याने केले आहे. तर गाण्याचे बोल विपुल शिवलकर याने लिहिले असून गाण्याला संगीतबद्ध अनुराग गोडबोले याने केले आहे. या अल्लड प्रेमाच्या गुंतन्याला लारीसा अलमेडा आणि अनुराग गोडबोले यांनी स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याच संकलन गुरू पाटील या तरूणाने केले असून नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी याने केले आहे.
from मनोरंजन https://ift.tt/D527stY
Post a Comment